खावटी अनुदान योजनेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
यवतमाळ,
दि. 17 : आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना एक
वर्षासाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत मनरेगावर
दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक दिवस कार्यरत असलेल्या
आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटूंबे, पारधी समाजाची सर्व कुटूंबे
जिल्हाधिकारी यांचे सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी
कुटूंबे, त्यामध्ये परित्यक्ता, घटस्फोटीत महिला, विधवा महिला, भुमिहीन शेतमजूर,
अपंग व्यक्ती असलेले कुटूंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटूंबे
यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे खावटी अनुदान योजनेसाठी संबंधितांनी त्वरीत नाव
नोंदणी करावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन
यांनी केले आहे.
पांढकरवडा
आदिवासी विकास विभागाकडून केळापूर, वणी, यवतमाळ, मारेगाव, बाभुळगाव, कळंब,
राळेगाव, घाटंजी, झारी जामणी या नऊ तालुक्यातील ग्रामस्तरीय तसेच शहरस्तरीय
भागातील सर्वेक्षणाचे काम या कार्यालयाचे खावटी अनुदान समन्वयकाकडून करण्यात आलेले
आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज यापूर्वी भरण्यात आले नाही त्यांनी त्यांचे
गावापासून जवळ अंतर असलेल्या ठिकाणी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक, प्राथमिक
आश्रमशाळा किंवा मुख्याध्यापक अनुदानित माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा तसेच गृहपाल
शासकीय मुलांचे, मुलींचे वसतीगृह यापैकी जवळ असलेल्या आश्रमशाळा वसतीगृहावर जावून
पात्र लाभार्थ्यांनी आपले खावटी अनुादन योजनेसाठी नाव नोंदणी करावे.
तसेच
ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त नमुद ठिकाणी जाणे शक्य होणार नाही, त्यांनी
9421425077, 9604803936 व 9822716714 या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्यांचा अर्ज व
आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, जातीचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पोस्टाचे
बँक पासबूक यांचे झेरॉक्स प्रती) पाठवावे. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी नाव नोंदणी
केलेली आहे त्या लाभार्थ्यांनी पुन्हा नाव नोंदणी करू नये. अनुसूचित जमातीचे पात्र
लाभार्थ्यांनी खावटी अनुदान योजनेसाठी नाव नोंदणी करून जास्तीत जास्त खावटी अनुदान
योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
तसेच
यवतमाळ जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी यामध्ये सहभाग घेवून खावटी अनुदान
योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नाव नोंदणी करण्यास योग्य सहकार्य करावे. जेणेकरून
खावटी अनुदान योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही व जास्तीत जास्त पात्र
लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
००००००००
Comments
Post a Comment