*मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार*
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि १० जाने:- लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यावर्षीपासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी 'निवडणूकवार्तांकन पुरस्कार' दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी
संस्थांना 'मतदार-मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. १० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील.
पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज करू शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरुपात माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई मेल आयडीवर अर्ज पाठवावा.
अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर मो.क्र. ८६६९०५८३२५ यांना संपर्क करावा असे आवाहन मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा
१६ ते २१ हजार दरमहा वेतन : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अंतर्गत जुलैमध्ये आयटीआय परीक्षेचे निकाल घोषित झालेले आहेत. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी यवतमाळच्या आयटीआयमध्ये सुझुकी मोटर गुजरात प्रा. लिमिटेड हंसलपुर, गुजरात या नामांकित कंपनीचा भरती मेळावा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केला आहे. या कंपनीमार्फत अॅप्रेन्टीस करीता १६ हजार ९०० तसेच फिक्स टर्म करीता २१ हजार दरमहा वेतन दिले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, मोटार मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझल, मेकॅनिक ट्रॅक्टर, टुल अॅण्ड डायमेकर, पिपीओ व पेन्टर जनरल व्यवसायासाठी जागा उपलब्ध आहेत. यासाठी इयत्ता १० वी मध्ये किमान ४० टक्के गुण, आयटीआयमध्ये किमान ५० टक्के गुण तसेच रूजु होतेवेळी वय १८ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. या संधीचा जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदरावांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment