इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे विशेष शिबीर
यवतमाळ, दि. ९ जानेवारी (जिमाका):- इयता ११ वी व १२ वी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी समितीद्वारे शिबीरे आयोजीत केलेली आहे. उमरखेड तालुक्यामध्ये गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, जि.यवतमाळ येथे ११ जानेवारीला शिबीराचे आयोजन ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे.
सदर शिबीरात सन २०२२-२३ मधील ११ वी व १२ विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी यांनी https:// bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्णभरलेला अर्ज व मूळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा व अर्जदार हा अनुसुचित जाती (SC), विमुक्त जाती, भटक्या जमाती(VJNT), विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडुन स्वीकारले जातील व पडताळणी केली जाईल. अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा.
ज्या विदयार्थींचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र समिती कडुन देण्याचा समितीचा मानस आहे. परिपुर्ण अर्जाकरीता आवशक असलेल्या कागदपत्रे व पुरावा यासाठी https://yavatmal.gov.in/notice_category/announcements/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानुसार कागदपत्रे सादर करावी. प्रत्येक तालुकामध्ये याप्रमाणे शिबीरे आयोजीत केली जातील. यवतमाळ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशापासुन वंचीत राहु नये हा शिबीराचा मुळ उद्देश आहे. तरी विद्यार्थ्यांनी शिबीरात मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान
पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पना > आज दारव्हा येथून होणार अभियानाला सुरुवात > यवतमाळ जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे > युपीएससी, एमपीएससीसह सरळसेवा परीक्षांविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन > ग्रामपंचायतींमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची उद्या दि. २० जानेवारी दारव्हा येथून सुरुवात होणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यास साहित्य सर्व ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, विविध सरळसेवा भरती परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ...
Comments
Post a Comment