गळती उद्भवल्यामुळे शहरात पाच दिवस पाणी पुरवठा बंद
यवतमाळ,दि.२९ मे.(जिमाका):-दत्त चौक परिसरात दोन दिवसापूर्वी वाघापूर ग्राम टाकीला जोडणाऱ्या सातशे मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे तिच्या दुरुस्तीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रारंभ केला असून ती दुरूस्त होईपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
वैभवनगर,वाघापूर टेकडी,मेडीकल टाकी,बालाजी मंगलम टाकी,विठ्ठलवाडी टाकी,पॉलीटेक्नीक व चांदोरे नगर टाकी या उंच पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणी पुरवठा गळतीचे काम दुरस्त होईपर्यंत शहरातील या भागाचा पाणीपुरवठा अंदाजे चार ते पाच दिवस बंद राहील, असे उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निखिल कवठळकर यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment