नुकसान भरपाईच्या रकमेतुन कर्ज वसुली करु नये -जिल्हाधिकारी

यवतमाळ, दि. २३ मे (जिमाका):- गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेल्या रकमेतून काही बँकाकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे. गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करतांना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही, याची संबंधित बँकांनी नोंद घेण्याच्या सुचना असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका पत्राद्वारे बॅंकांना दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी