शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी ९४०३२२९९९१ टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करावा -जिल्हा कृषी अधिकारी
यवतमाळ,दि. २५ मे (जिमाका):- खरीप हंगाम २०२३- २४ लवकरच सुरु होणार असून शेतकरी मोठयाप्रमाणात बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकांची खरेदी करतात. विविध कृषिनिविष्ठा केंद्रामधुन शेतकऱ्यांना निकृष्ठ दर्जाचे बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी बियाण्यांची उगवण,पिकाची वाढ, जणुकीय अशुध्दता, रासायनीक खते किंवा किटकनाशके यांचे मुळे पिकांचे नुकसान अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्या करीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर शेतकरी तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ९४०३२२९९९१ असा आहे. तेव्हा शेतकऱ्यांना बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके संदर्भामध्ये तक्रारी असल्यास शेतक-यांनी टोल फ्री क्रमांक ९४०३२२९९९१ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यवतमाळ नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment