Posts

Showing posts from 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात आपली पुंजी आपला अधिकार अंतर्गत कार्यशाळा संपन्न

यवतमाळ, दि. 31 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ठेवीदार शिक्षण आणी जागरूकता निधी अर्थात डिफ अंतर्गत कॅम्प संपन्न झाला. बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिशा निर्देशानुसार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 डिसेंबर रोजी डिफ कॅम्प जिल्हा स्तरावर प्रचार व प्रसिद्धी करीता घेण्यात आलेला होता. या कॅम्पमध्ये पात्र खातेधारकांनी सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या हक्काची रक्कम सहव्याज परत मिळविण्याची प्रक्रिया पार पाळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी उपस्थित ग्राहकांना डिफ कॅम्पच्या संकल्पनेची माहिती दिली तसेच ग्राहकांना त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळविण्यासाठी कॅम्पचा फायदा घेण्याचे आव्हान केले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व बँकांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच त...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतजमीन विक्रीचे आवाहन

यवतमाळ, दि. 30 (जिमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ४ एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा २ एकर बागायती (ओलिताखालील) जमीन १०० टक्के अनुदानावर दिली जाते. या योजनेसाठी जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील राणी अमरावती तसेच यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण भागातील शेतजमीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी आपली जमीन शासनास विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी शासकीय (रेडीरेकनर) दराने जमीन विक्रीस तयार असल्यास अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे इच्छुक शेतकऱ्यांकडे किमान २ एकर बागायती जमीन किंवा ४ एकर जिरायती स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे. कमाल क्षेत्राची कोणतीही अट नाही. जमीन निर्धोक व बोजारहित असावी तसेच जमीनविषयक कोणतेही न्यायालयीन किंवा महसूल अपील प्रकरण प्रलंबित नसावे. बागायती जमिनीच्या बाबतीत पाण्याची काय सोय आहे व जमीन रस्त्यालगत आहे की अंतर्गत आहे, याची माहिती...

नायलॉन मांजा वापरल्यास मोठ्या आर्थिक शिक्षेची तरतूद होणार > उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा प्रस्ताव निवेदन- हरकती मागविल्या

यवतमाळ, दि. 26 (जिमाका): नायलॉन मांजाविरोधातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश पारित करुन नायलॉन मांजा वापरासंबंधी व विक्रीसंबंधी दोषी आढळल्यास मोठ्या आर्थिक शिक्षेची कठोर कारवाई प्रस्तावित केली आहे. त्याबाबत संबंधित मांजा वापरकर्ते किंवा विक्रेत्यांकडून निवेदन मागविण्यात आले आहे. नायलॉन मांजा वापरासंबंधी व विक्रीसंबंधी कठोर कारवाई करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यात सूचना जारी केली आहे. जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांज्याने पतंग उडवताना आढळल्यास त्याच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर या न्यायालयात ५० हजार रु. जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत ? त्याचप्रमाणे, नायलॉन मांज्याने पतंग उडवताना प्रौढ व्यक्ती आढळल्या, ५० हजार रू. जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत? ज्या विक्रेत्याकडून नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आणि विक्रीच्या उद्देशाने नायलॉन मांजाच्या साठा ज्याच्या ताब्यात आढळला आहे, त्याला प्रत्येक उल्लंघनासाठी अडीच लाख रू. जमा करण्याचा आदेश का देऊ नये ?, अशी ...

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज बळीराजा चेतनाभवनात ग्राहकांना मार्गदर्शन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज बळीराजा चेतनाभवनात ग्राहकांना मार्गदर्शन यवतमाळ, दि. 24 (जिमाका): समाजजीवनात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, ते आत्मसात करताना ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय ग्राहकदिन कार्यक्रमात विविध मान्यवरांनी व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बळीराजा चेतनाभवनात कार्यक्रम झाला. अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार अपलप, अ. भा. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र निमोदिया, अ. भा. ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष अभिजित पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तायडे, पोलीस अंमलदार अविनाश सहारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अक्षय जयस्वाल आदी उपस्थित होते. जिल्हा सायबर सेलतर्फे सपोनि श्री. तायडे यांनी ऑनलाईन गुन्ह्यांचे स्वरूप व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, 2025 मधील आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यां...

विधी संघर्षग्रस्त बालकांना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन

विधी संघर्षग्रस्त बालकांना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन यवतमाळ, दि. 24 (जिमाका): विधी संघर्षग्रस्त बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल न्याय मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. शासकीय निरीक्षण गृह व बाल गृह येथे ही कार्यशाळा सोमवारी झाली. बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी श्रीमती शर्वरी जोशी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन होणे काळाची गरज आहे. "स्वावलंबी होणे हाच सन्मानाने जगण्याचा एकमेव मार्ग आहे," असे प्रतिपादन श्रीमती जोशी यांनी यावेळी केले. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कर्ज सुविधांची माहिती आरएसईटीआय संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक दीपक तिवारी यांनी बालकांना उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसा...

वेध राष्ट्रीय जनगणनेचे : तयारीला गती अधिकारी- कर्मचा-यांना प्रशिक्षण

वेध राष्ट्रीय जनगणनेचे : तयारीला गती अधिकारी- कर्मचा-यांना प्रशिक्षण यवतमाळ, दि. 24 (जिमाका): आगामी जनगणना २०२७ यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या प्रशिक्षणात जनगणना प्रक्रियेची उद्दिष्टे, कार्यपध्दती व प्रशासकीय समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूध्द बक्षी, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणात घरगणना व लोकसंख्या गणना, माहिती संकलनातील अचूकता, तंत्रज्ञानाचा वापर, माहितीची गोपनीयता, वेळापत्रकानुसार कामकाज, तसेच संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, आगामी काळात जनगणना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण कार्यक्रमास सर्व तहसिल कार्यालये तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती मधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मास्टर ट्रेनर सहायक संचालक प्र...

नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश

नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश यवतमाळ, दि. 24 (जिमाका): राळेगाव तालुक्यात गोपालनगर परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह जिल्हा प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबविले. दिनांक २३ डिसेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दोन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार होते. अंगणवाडी सेविकेकडील नोंदींच्या आधारे दोन्ही बालकांचे वय १६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार बालिकेसाठी किमान १८ वर्षे व बालकासाठी २१ वर्षे वय आवश्यक असल्याने सदर विवाह बालविवाह ठरत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन यवतमाळचे केसवर्कर शुभम दत्ता कोंडलवार व अश्विनी दिलीप नासरे यांनी गाव बाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका सरला आडे, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच राळेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर बालविवाह तत्काळ थांबविला. कार्यवाहीदरम्यान पालकांना बालविवाह...

बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष मोहिम

बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष मोहिम यवतमाळ, दि. 24 (जिमाका): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात बँकेत दावा न केलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळण्यासाठी विशेष मोहिम सर्व बँकांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेतर्फे दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नियोजनभवनात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ बँक, पेंशन, विमा, शेअर, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी जमा राहिलेल्या व व्यवहार न झालेल्या रकमा रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये जमा केल्या जातात. या मोहिमेअंतर्गत अशा बेवारस ठेवी खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यात येणार आहेत. दावा करण्यासाठी नागरिकांनी उद्गम पोर्टल किंवा संबंधित बँक/संस्थेच्या संकेतस्थळावर नाव तपासून आवश्यक कागदपत्रांसह खाते क्रमांक, केवायसी इ. संबंधित बँकेत अर्ज करावा. पात्र नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या हक्काची रक्कम सव्याज परत मिळवावी, असे आवाहन ज्ञानेश्वर टापरे, जिल्हा अग्रणी बॅक प्रबंधक यांनी केले आहे. 000000

कामांच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता : कायदेविषयक शिबिरातून मार्गदर्शन

कामांच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता : कायदेविषयक शिबिरातून मार्गदर्शन यवतमाळ, दि. 24 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महिलांच्या नोकरी किंवा कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कायदेविषयक शिबिर सोमवारी बळीराजा चेतना भवनात झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर चु. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे यांच्या पुढाकाराने घेण्यात हे शिबीर झाले. उपजिल्हाधिकारी पूनम भिला अहिरे अध्यक्षस्थानी होत्या. अभिषेक मेमोरिअल फौंडेशनच्या प्रा. डॉ. सुप्रभा यादगीरवार यांनी कायद्यातील तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. “कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण अधिनियम, २०१३ विषयी माहिती देण्यात आली. या कायद्याअंतर्गत लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार समिती स्थापन करण्याची जबाबदारी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, गोपनीयता व संरक्षणात्मक तरतुदी याविषयी उपस्थितांना अवगत करून देण्यात आले. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व समतावादी कार्य वातावरण मिळावे हा या कायद्याचा मुख्य उद्देश ...

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात 28 बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करणार

Image
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात 28 बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करणार यवतमाळ, दि. 24 (जिमाका): राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत शिवनेरी बाल रूग्णालय व कार्डियाक सेंटर येथे २ डी ईको तपासणी शिबिरात ० ते १८ वयोगटातील एकूण ७९ बालके व विद्यार्थ्यांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. त्यात एकूण २८ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे आढळल्यावरून या सर्व विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विनामूल्य हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे बालहृदयरोग तज्ञ डॉ. शंतनू गोमासे (कार्डियोलॉजिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. तपासणीतून या शिबिरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण व डॉ. अनिल आखरे (बालरोग तज्ञ) आदी उपस्थित होते. तसेच आरबीएसके जिल्हा पर्यवेक्षक कृणाल पिसोळे, सांख्यिकी अन्वेषक बळीराम राठोड व आरबीएसकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावरील ० ...

एकलव्य निवासी विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एकलव्य निवासी विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर यवतमाळ, दि. 24 (जिमाका): इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी विद्यालयात प्रवेशासाठी आदिवासी विकास अप्पर आयुक्तांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा दि. 22 फेब्रुवारी 2026 होणार आहे. त्याचप्रमाणे, पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ही प्रवेश परीक्षा दि. १ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार असून, शासकीय आश्रमशाळा शिबला ता. झरी, जि. यवतमाळ व शासकीय आश्रमशाळा अंतरगाव ता. कळंब, जि. यवतमाळ येथे होणार आहे. इयत्ता ६ वी साठी परीक्षा सकाळी ११ ते १ या वेळेत तर इयत्ता ७ वी ते ९ वी साठी सकाळी ११ ते 2 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीचे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय, तसेच या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र २०२५–२६ ...

बँकांनी अधिकाधिक प्रकरणे मंजूर करून उद्योग वाढीस प्रोत्साहन द्यावे – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. 23 (जिमाका): बँकांनी अधिकाधिक प्रकरणे मंजूर करून जिल्ह्यात उद्योग वाढीस प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे जिल्हा अग्रणी बँक यांच्यातर्फे सप्टेंबर २०२५ तिमाही अखेर झालेल्या आर्थिक वर्षातील बँकर्स समीक्षा बैठकीत ते बोलत होते. या आर्थिक वर्षातील सर्व सरकारी प्रोत्साहनपर उपक्रम व प्राथमिक क्षेत्रातील कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी व बँक अधिकारी उपस्थित होते. अग्रणी बँक प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, यांनी जिल्ह्यातील बँकाद्वारा सप्टेंबर २०२५ अखेर प्राप्त लक्षांक व बँकेने साध्य केलेले उदिष्टे या संबंधी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर केली. जिल्ह्यात या आर्थिक वर्षात एकूण कर्ज वाटप ६ हजार १६१ कोटीचे झालेले असून ते लक्षांकाच्या ६६ टक्के आहे. प्राथमिक क्षेत्राला ४२८९ कोटीचे व अप्राथमिक क्षेत्रास १८७२ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. अन्य प्राथमिक क्षेत्रामध्ये १११ कोटीचे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला १५०० कोटीचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी...

आदर्श गाव योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी विभागाच्या कामांचा आढावा

यवतमाळ, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदर्श गाव योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, प्रगती, येणाऱ्या अडचणी तसेच पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदर्श गाव योजनेत कृषी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. आधुनिक शेती पद्धती, मृदसंधारण, पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक विविधीकरण, सेंद्रिय शेती तसेच शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच योजनांचा थेट लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून आदर्श गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण असावीत, ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढवावा आणि विविध विभागा...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 आढावा कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण व्हावीत -जिल्हाधिकारी विकास मीना

Image
यवतमाळ, दि. 19 (जिमाका): नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि सर्व कामे निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन,उत्पादकता, उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-2) अंतर्गत सुरू असलेल्या तसेच आगामी काळात सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत योजनेची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडचणी आणि पुढील टप्प्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांच्यासह कृषी विभाग, पाणलोट विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. योजनेत वैयक्तिक गटाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे. शेतीचा विकास करण्यासाठी तसेच पिकाचे विविध करण करणे शेतीचा शाश्वत विकास साधने सिंचन सुविधा न...

मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी जमाबंदी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना जार

यवतमाळ, दि. 18 (जिमाका): खरीप हंगाम 2025 मध्ये विहीत मुदतीत ई- पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकरी बांधवांनी ऑफलाईन पाहणीचे अर्ज 24 डिसेंबरपूर्वी ग्राम महसूल अधिका-यांकडे देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 रोजी जारी झाला. त्यानुसार जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून सर्व जिल्ह्यांना या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ऑफलाईन पाहणीसाठी ग्रामस्तरीय समिती मंडळ अधिका-यांच्या अध्यक्षतेत स्थापण्यात येत असून, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी हे सदस्य आहेत. ज्या शेतक-यांना काही कारणांस्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतक-यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दि. 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याबाबत अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतक-याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष ...

बालविवाहमुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांचा निर्धार डॉ.नंदुरकर विद्यालयात जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
यवतमाळ, दि. 18 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व डॉ. नंदुरकर विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ व बाल विवाह मुक्त भारत या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या न्युनतम कार्यक्रम २०२५ अंतर्गत, शेखर चु. मुनघाटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती तृप्ती आसवा, सहाय्यक लोक अभिरक्षक,या उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती माधुरी कोटेवार (चौधरी), जिल्हा समन्वयक, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्योती प्रमोद बावीसकर, मुख्याध्यापिका, डॉ. नंदुरकर विद्यालय तसेच सुहासिनी संदीप गायकवाड, सहाय्यक शिक्षिका यांची प्रमुख उपस्थिती होती. माधुरी कोटेवार यांनी पोक्सो कायदा, बाल विवाह मुक्त भारत अभियान तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी सविस्तर माहिती दि...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध

यवतमाळ, दि. 17 (जिमाका): श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, यवतमाळ येथे नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कार्यान्वित आहेत. रुग्णालयात कार्डीओलॉजी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, इकोकार्डीओग्राफी,न्युरोसर्जरी,मेंदूच्या शस्त्रक्रिया,हेड इन्ज्युरी, युरोसर्जरी,मुत्रविकार,मुतखडा इ.शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी, तसेच सी.टी. स्कॅन व एम.आर.आय. तपासणी सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. नागरिकांनी या शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. वसंतराव नाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अरुण ऊईके, यांनी केले आहे. 000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन 31 डिसेंबरपर्यंत मुदत

यवतमाळ, दि. 17 (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नवीन किंवा नुतनीकरण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात हार्डकॉपी सादर करावी. अर्ज सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन श्रीमती मंगला मुन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी केले आहे. 000000

जिल्हाधिकारी यांचा नेर दौरा विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा -जिल्हाधिकारी विकास मीना

Image
यवतमाळ, दि. ११ : शासकीय योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज नेर तालुक्याचा दौऱ्यादरम्यान दिले. नेर दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन तसेच कृषी विषयक प्रकल्पांना भेटी दिल्या. या प्रसंगी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, अप्पर तहसीलदार ओंकार एकाळे, पोलीस निरीक्षक श्री. बेहरानी, निवासी नायब तहसिलदार श्री. बकाले, नायब तहसिलदार श्री. इंगोले व श्री. पंधरे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जया चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले, उपकार्यकारी अभियंता श्री. पटेल (लघु सिंचन), सहाय्यक निबंधक श्री. भगत, गटशिक्षणाधिकारी श्री. देशपांडे, उपअधीक्षक भूमिअभिलेख श्री. गायनर, दुय्यम निबंधक श्री. इंगळे ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. भोयर तसेच नगरपरिषद कार्यालयाचे अधीक्षक कपिल देवकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे, लोकाभिमुख उपक्रम आणि सर्वसमावे...

डॉ. मिर्झा यांना अभिवादनासाठी शनिवारी श्रद्धांजली सभा

Image
यवतमाळ दि.१०: 'हास्य सम्राट ', 'मिर्झा एक्सप्रेस ' डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबरला निधन झाले. शनिवार दिनांक १३ डिसेंबरला त्यांना अभिवादन करण्यासाठी श्री. फकीरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे धनज माणिकवाडा हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे पितृक गाव आहे.शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ही श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ.मिर्झा यांच्यावर प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांनी, रसिकांनी मोठ्या संख्येने या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेल्या 50 वर्षांपासून विविध विचारपीठांवरून ,कवी संमेलनातून, तीन पिढ्यांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे डॉ. मिर्झा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी 28 नोव्हेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त करता याव्यात यासाठी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्यावर प्रेम...

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ, दि. 8 - दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेखाली सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये विशेष गौरव पुरस्कार, माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती, विविध कल्याणकारी योजनांचे धनादेश वाटप तसेच युध्दविधवा, वीरमाता यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजदिन शुभारंभ कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी केले आहे. 000

“माझी लाडकी बहिण” योजना केवायसी व मोबाइल लिंकिंगसाठी आयपीपीबी मार्फत जिल्हास्तरीय उपक्रम लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यावी - जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि.5 (जिमाका) : ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी केवायसी, तसेच आधार मोबाईल लिंकिंग त्वरित पूर्ण करावे. तसेच महिलांसाठी कमी प्रीमियममध्ये उपलब्ध संरक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे केवायसी व आधार जोडणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे वरिष्ठ शाखा प्रबंधक चित्रसेन बोदिले आणि प्रबंधक अमोल रंगारी उपस्थित होते. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे (IPPB) जिल्ह्यातील सर्व पोस्टमन तथा ग्रामीण डाक सेवक ह्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी व मोबाईल क्रमांक जोडणी करण्यासाठी मिशन मोडवर संपूर्ण सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे केवायसी कामकाज वेगाने पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. पोस्ट बँकेतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या नारी सुरक्षा कर्करोग कव्हर पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्करोगासाठी रुपये ...

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर

यवतमाळ, दि. 4 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषद, तसेच वणी न. प. मधील प्रभाग क्र.14-क, दिग्रसमधील प्रभाग क्र.2-ब,5-ब,व 10-ब आणि पांढरकवडा मधील प्रभाग क्र.8-अ व 11-ब या नगरपरिषदांच्या काही प्रभागांसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले. सुधारित निवडणूक कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित नगरपरिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर आज प्रसिध्द करण्यात आली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या संबंधित नगरपरिषदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद यवतमाळसाठी निवड...

जागतिक दिव्यांग दिनी कायदेविषयक मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 3 (जिमाका): मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व नवजिवन गतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर "दिव्यांग दिन" निमित्त नवजिवन गतिमंद विद्यालय, यवतमाळ येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन श्रीमती मंगला मून, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी केले. तसेच श्री मुपारी, महल्ले, केशरवार, सुजित, श्रीकांत राठोड आणि शेख रफिक इब्राहिम, अध्यक्ष नवजिवन गतिमंद विद्यालय हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक वक्त्या श्रीमती मंगला मून यांनी समाजात जसे इतर व्यक्तीकडे पाहिले जाते तसेच सन्मानाने मतिमंद मुलांकडेही पाहिले पाहिजे, असे आवर्जून सांगितले. गतिमंद बालकांसाठी शासनाकडून उपलब्ध विविध सुविधांची माहिती देत त्यांनी दिव्यांग अधिन...

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून मतदान केंद्रांना भेट

Image
यवतमाळ, दि. २ डिसेंबर (जिमाका) : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध निवडणूक क्षेत्रांतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा पडताळा घेतला. जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी नेर येथील तहसील कार्यालय येथील स्ट्रॉंग रूमला भेट दिली. मतदान साहित्य वाटप, साहित्य घेणे या व्यवस्थेची पाहणी केली. कंट्रोल रूमला भेट दिली व मतमोजणी व्यवस्थेबाबतची माहिती करून घेतली. नेर येथील श्री शिवाजी विद्यालय येथील बूथ क्रमांक 1/1, 1/2, 1/3 ला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच दारव्हा येथील मनोहर नाईक विद्यालय येथील प्रभाग क्रमांक 9 येथील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. व दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळा येथील पिंक मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे, त्यांनी पुसद येथे नगरपरिषद केंद्र क्र.2/2, प्रभाग क्र.2 तसेच पीएमश्री स्व.विठ्ठलराव हैबती चव्हाण न.प.म.उ.प्राथमिक शाळा क्र.8 इटावा बुथचीही पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध केल...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे संविधान दिन साजरा

यवतमाळ, दि. २ (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिना निमित्य दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच दाभाडे, हे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणून राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल कुलकर्णी व पर्यवेक्षक देवेंद्र भिसे तसेच प्रमुख वक्ते म्हणुन अॅडव्होकेट जयसिंग चौहाण हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रफुल कुलकर्णी यांनी केले. प्रमुख वक्ते अॅडव्होकेट जयसिंग चौहाण यांनी संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जात असल्याचे यावेळी सांगितले तसेच २९ ऑगष्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली त्यांच्या अनेक बैठका व चर्चासंत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याबाबत विस्तृत माहिती ...

मोटारसायकलसाठी क्रमांकांची नवीन मालिका सुरू आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे 'आरटीओं'चे आवाहन

यवतमाळ, दि. २ (जिमाका) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन ४ या प्रणालीवर परिवहनेत्तर विभागातील सुरु असलेली मोटार सायकलची सिरीज एमएच २९ सीएन संपुष्टात येत असल्याकारणाने नविन मोटार सायकलची सरीज एमएच२९ सीपी दि.4 डिसेंबर पासून सुरु होत आहे. ज्या ग्राहकांना नविन आकर्षक नंबर घ्यावयाचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन नविन आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त १ दिवसासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर आपणास ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल याची ग्राहकांनी कृपया नोंद घावी. असे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सुर्यवंशी यांनी कळविले आहे. 000000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

मुंबई, दि. 2 : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाद्वारे १ लाख दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, हा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे . या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे हा आहे. कृत्रिम हात, पाय, श्रवणयंत्रे, ...

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी जिल्ह्यात 55 प्रकरणांचा समावेश; पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.1(जिमाका): अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील सन 2012 ते 2025 या काळातील एकुण 55 प्रकरणांचा समावेश असून, केवळ 28 प्रकरणी प्रस्ताव प्राप्त आहेत. उर्वरित प्रकरणांत पात्र वारसांनी दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत महसूलभवनात झाली. समितीच्या सदस्य सचिव श्रीमती मंगला मून यांनी प्राप्त प्रस्तावांची माहिती समितीस सादर केली. अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांत दिवंगत व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी देण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दि. 20 नोव्हेंबर रोजी प्रसृत करण्यात आला. हा शासन निर्णय आल्यानंतर दि. 28 नोव्हेंबरला त्यात नमूद 55 प्रकरणांतील पिडीत कुटुंबीयांची सभा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयात...

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूरात भव्य कार्यक्रम श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह टपाल तिकीट जारी होणार

मुंबई दि.३० – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह भारतीय डाक विभागामार्फत स्मृतिचिन्ह म्हणून टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय घेतला. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेश चंद्र सुरी ग्राउंड, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा येथे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रदर्शनी समितीची बैठक मुंबईत नुकतीच झाली. यावेळी नियोजनाबाबत चर्चा आणि प्रदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस कोकण भवनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य रविंद्र पवार, राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष तथा समितीचे निमंत्रक व कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी डॉ. जगदि...

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी महिन्यात नांदेड येथे करण्यात आले आहे. या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे.

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन विविध उपक्रमांद्वारे माहिती सर्वदूर पोहोचवा - जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. २८: ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विदर्भात नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून, विविध माध्यमांतून या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी, महोत्सव समितीचे सदस्य, गुरूद्वारा समितीचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त वि...

नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मतदानाच्या दिवशी सर्व कामगार मतदारांना सुट्टी देण्याचे आवाहन

यवतमाळ,दि. २८ (जिमाका) : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५(बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यानुसार दि. २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा. रा. काळे यांनी केले आहे. सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याने मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागू नये. यासाठी दि.2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या दिवशी निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना ल...

विद्यार्थ्यांनी राबविला अभिरूप मतदान उपक्रम > मतदारजागृती अभियान जिल्हाधिका-यांचा सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद व कौतुक

यवतमाळ,दि. 28 (जिमाका) : मतदार जागृती अभियानात यवतमाळ येथील गोधनी रस्त्यावरच्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अभिरुप मतदान कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार ही अभिरूप मतदान प्रक्रिया राबवली. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये विकसित करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया अनुभवण्यासाठी चुनावी पाठशाळा (अभिरुप मतदान) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार यवतमाळच्या शासकीय शाळेत आज संपुर्ण निवडणूकीची तयारी करण्यात आली. यामध्ये शाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांनी निवडणू...

न.प., न. पं. सार्वत्रिक निवडणूक जिल्हाधिका-यांकडून सुरक्षाविषयक आढावा निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोर पालन व्हावे निवडणुकीदरम्यान कुठेही गैरप्रकार घडता कामा नये -जिल्हाधिकारी विकास मीना

Image
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील न. प., न. पं. सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी महसूलभवनात बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रोहिदास दोरकुळकर आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मीना म्हणाले की, मतदानाचा दिवस, आदला दिवस, मतमोजणीचा दिवस या कालावधीत पालन करावयाच्या सर्व बाबींविषयी सुस्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. मतदान केंद्रांवर विशेषत: संवेदनशील केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ठेवावा. प्रत्येक पोलीस पथकात महिला कॉन्स्टेबलचा समावे...

यवतमाळमध्ये 4 जानेवारीला ‘हेल्थ मॅरेथॉन’

नववर्षाच्या प्रारंभी आरोग्यदायी उपक्रम यवतमाळमध्ये 4 जानेवारीला ‘हेल्थ मॅरेथॉन’ अधिकाधिक यवतमाळकरांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी विकास मीना यवतमाळ, दि. 27 : आरोग्यविषयक जनजागृती व फिटनेसला चालना देण्यासाठी ‘यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन’चे आयोजन दि. 4 जानेवारी 2026 रोजी करण्यात येत आहे. हा उपक्रम समृद्ध व निरामय आरोग्याची जाणीव निर्माण करणारा असून, अधिकाधिक यवतमाळकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. कॉटन सिटी रनर्सतर्फे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा पोलीस दल तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने नेहरू क्रीडांगण (गोधणी रस्ता, यवतमाळ) येथून यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हा उपक्रम 21 कि. मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि. मी. पॉवर रन, 5 कि. मी. फिटनेस रन, 5 कि. मी. बाल रन, 3 कि. मी. कौटुंबिक, फन रन या प्रकारात होईल. नोंदणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन चौथ्या व...

रब्बीसाठी सुधारित पीक विमा योजना; 15डिसेंबरपूर्वी सहभागी व्हा शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आवाहन

रब्बीसाठी सुधारित पीक विमा योजना; 15डिसेंबरपूर्वी सहभागी व्हा शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आवाहन यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये रब्बी हंगाम 2025-26 पासून सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली असून, वातावरणातील अनियमितता, कीडरोग आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना या योजनेतून संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टरवर हरभरा आणि साठ हजार हेक्टरवर गहू पेरणी अपेक्षित आहे. गहू व हरभरा पिकासाठी विमा काढण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर, तर उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे. हरभरा पीकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम 36 हजार रू. असून, विमा हप्ता 360 रु. आहे. गहू बागायत पीकासाठी प्रति हे. विमा संरक्षित रक्कम 45हजार असून विमा हप्ता 450 रु. आहे. उन्हाळी भुईमूग पीकासाठी प्रति हे. विमा संरक्षित रक्कम 40 हजार 600 रू. असून, विमा हप्ता 101.50 रू. आहे. पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. शेतक-यांनी शेतात पीक नसताना विमा का...

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू'

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू' यवतमाळ, दि. 27 : शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाची 1800 221 251 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी - विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी एसटी महामंडळ बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पासमध्ये 66.66 टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना घरुन शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एस...

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन • २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन • तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन • २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन • तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक यवतमाळ, दि. २७ : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार असून देशभरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. तो दर बारा वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर भरतो. अमृत मंथनाच्या आख्या...

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन किटकशास्त्र विभागाच्या चमूने दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रक्षेत्रावर पाहणी केली असता कपाशीवर रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीचे एकीकृत व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते . त्यासाठी खालील उपाययोजना अवलंब करावा . एकीकृत व्यवस्थापनः रस शोषक कीडीचे व्यवस्थापन § रंस शोषक कीडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भावबाबत सर्वेक्षण करावे. § पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (२५/हे.) § वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य ताणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य ताणे जसे अंबाडी ई नष्ट करावी. § मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक काचीकड होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किहही कमी प्रमाणात राहील. § रस शोषक किडीवर उपनिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कालीन, ढालकिडे, क्रायसोप...

तूर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन

तूर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन सध्या तूर हे पिक फुलावर येण्याच्या स्थितीत आहे मागील काही आठवडयातील असणारे सतत चे ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय योजना करणे आवशक आहे. शेंगा पोसारणा-या अळयांमधे खालील प्रकारच्या अळयांचा समावेश होतो. १. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्षा): या किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा, यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन गुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते असे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळया शेंगांना सिद्ध करून आतील दाणे पोखरून खातात. २. पिसारी पतंग : या पतंगाची अळी १२.५ मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहे...