Posts

Showing posts from 2025

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतक-यांना प्रशिक्षण

Image
यवतमाळ, दि.31 (जिमाका) : भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था, व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑक्टोबर रोजी माळवणी, कळंब येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कछवे होते. विशेषज्ञ किटकशास्त्र कृषि विज्ञान केद्र डॉ.प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी राहुल चव्हाण, सरपंच दिपाली जामुलकर, सुदर्शन पतंगे,शिवानी बावनकर, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते. विदर्भातील पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव,पांढरकवडा, वणी, मारेगाव, घाटंजी, आर्णी तालुक्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाच्यादृष्टीने शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे. कार्...

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

Image
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्तआणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी, तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 0000000

सरदार@१५० पदयात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद > जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युवकांनी > घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ

Image
यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : मेरा युवा भारत केंद्र व युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंतीनिमित्त सरदार@150 एकता पदयात्रा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली. शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह युवक, नागरिकांचा पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी विकास मीना व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अमोलकचंद महाविद्यालय येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी श्री. मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून पदयात्रा मार्गस्थ केली. क्रांतिताई राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भांडवलकर, एनसीसी कर्नल अनुप नायर, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम अनिल ढेंगे, सुरज गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आणि पोलीस अधीक्षक यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली. जितेंद्र सातपुते यांनी सर्वांना आत्मनिर्भर...

‘मनरेगा’ मजुरांसाठी फेस ई-केवायसी अनिवार्य ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा: प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ,दि.29(जिमाका):महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे प्रत्येक मजुराची ओळख मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येणार असून, ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या मदतीने ही प्रक्रिया संबंधित मजुरांना आपल्या गावातच पूर्ण करता येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या प्रक्रियेसाठी ग्राम रोजगार सहाय्यकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व मजुरांनी आपली फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ४ लक्ष २३ हजार ९७६ सक्रिय मजुरांपैकी १ लक्ष २१ हजार ४० मजुरांची फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित मजुरांनी तातडीने आपल्या ग्राम रोजगार सहाय्यक व तांत्रिक सहाय्यकांशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.फेस ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच मजुरांची माहिती नरेगा संकेतस्थळावर नोंदविली जाईल. यामुळे ज्यांची फेस ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्या उपस्थितीची नोंद होणार नाही आण...

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी 4 नोव्हेंबरला काम वाटप सभा

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी 4 नोव्हेंबरला काम वाटप सभा यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप सभा दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या सभेसाठी सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आपले ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता यांच्याकडून करण्यात आले आहे. 00000

सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण

सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण प्रकल्प अंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. यवतमाळच्या सभागृहात कर्मचा-यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, तालुका लेखापरिक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोडल अधिकारी तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे सचिव उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये नाबार्डमधील पीडब्ल्यूसीचे निखिल सावरकर आणि प्रथमेश देसाई यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे संस्थांच्या संगणकीकरणासाठी उपलब्ध सॉफ्टवेअर व त्यामधील २२ प्रकारचे मॉड्युल्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या सॉफ्टवेअरचा वापर संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी कसा करावा आणि संगणकीकरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत माहिती दिली. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण हा केंद्रीय सहकार विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रक...

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत यवतमाळ, दि.30 (जिमाका) : राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात दि.13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपुर्व जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे होणार आहे. तज्ज्ञांची मदत मिळेल या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भू-अर्जन मामले, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व ...

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट · पोलीस स्टेशनची केली पाहणी

Image
यवतमाळ, दि. २९ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री मदन ऐरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी रोपटे देऊन स्वागत केले व पोलीस स्टेशनची माहिती सांगितली. पोलीस प्रशासनातर्फे 27 लाख 11 हजार 111 रुपयांच्या निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. वीर शहीद जवान पत्नी सुनिता प्रकाश विहीरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा वाटप करण्यात आला...

पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
· पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती समारोह उत्साहात संपन्न * दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी यवतमाळ, दि. 29 (जिमाका) : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पाहोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतिक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पांडे, विजय कद्रे, मनीष गंजीवाले, गजानन परसोडकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री....

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
यवतमाळ, दि. १३ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मं...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन

Image
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन* यवतमाळ, दि. १३ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना व विविध मान्यवरांनी स्वागत केले. पुढील कार्यक्रमासाठी रवाना. ०००

मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
यवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत, मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संजय देशमुख, बळवंत वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, ॲड आशिष देशमुख, किसनराव वानखेडे, सईताई डहाके, रामकथाचे आयोजक डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राम कथा ही सर्वात सुंदर कथा आहे. त्यामुळे ही राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे आहे. राम कथेमध्ये संपूर्ण जीवनाची सुंदर शिकवण आहे. मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण राम कथा ऐकायला मिळणे हे प्रत्येकासाठी सौभाग्याचा क्षण आह...