11 मृत्युसह 518 पॉझेटिव्ह ; 505 जण बरे


       यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात सहा मृत्युसह 518 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 505 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 65 व 83 वर्षीय पुरुष तसेच 80 व 90 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 47 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 72 व 79 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 65 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 58 वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि बाभुळगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 518 जणांमध्ये 340 पुरुष आणि 178 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 179 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 63, पांढरकवडा 47, पुसद 35, नेर 27, दिग्रस 25, राळेगाव 22, आर्णि 21, दारव्हा 21, घाटंजी 18, महागाव 18, मारेगाव 10, बाभुळगाव 8, झरीजामणी 7, उमरखेड 2 आणि इतर शहरातील 15 रुग्ण आहे.

            शुक्रवारी एकूण 3404 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 518 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2886 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3170 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1725 तर गृह विलगीकरणात 1445 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 32703 झाली आहे. 24 तासात 505 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 28808 आहे. तर जिल्ह्यात एकूण 726 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.74 असून मृत्युदर 2.22 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 304385 नमुने पाठविले असून यापैकी 302071 प्राप्त तर 2314 अप्राप्त आहेत. तसेच 269368 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी