एका आठवड्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह
Ø गाव बाल संरक्षण समितीची
सतर्कता
यवतमाळ, दि. 12 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे एकाच आठवड्यात चार बाल
विवाह थांबविण्यात आले. यामध्ये नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील बालिका वय 17
वर्ष हिचा विवाह 1 एप्रिल रोजी, पुसद
शहरातील
वय 14 वर्ष बालिका व दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील 17 वर्षीय बालिका यांचा
विवाह 6 एप्रिल रोजी आणि दारव्हा
तालुक्यातील वडगाव येथील 17 वर्षीय बालिका
हिचा विवाह 7 एप्रिल रोजी होणार होता.
सदर बालविवाह हे आप्तसंबधियांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळताच
तत्परतेने चारही मुलीचे वय निश्चित करण्यात आले व तालुकास्तरीय यंत्रणेला
कळविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष,
पोलिस
उपनिरीक्षक, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, चाईल्ड लाईन यांनी
प्रत्यक्ष गावात भेट
दिली.
सर्वांनी संबधित कुटुंबाना बालिका या अल्पवयीन असून सदर विवाह बेकायदेशीर असल्याचे
सांगितले. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये
नमुद असलेल्या
शिक्षेची
व कार्यवाहीची माहिती दिली.
मुलीच्या आई वडिलांनी नियोजित विवाह आम्ही मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर
करू, अशी हमी सर्व
पदाधिका-यांना
दिली व तसा लेखी जवाब मुलींच्या आई-वडीलांनी व नातेवाईकांनी दिला. ही कार्यवाही
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
सदर कारवाई ही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परीवेक्षा अधिकारी
महेश हळदे, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) अविनाश पिसुर्डे, संरक्षण अधिकारी(संस्था
बाह्य) माधुरी पावडे, आकाश बुरेवार,पोलिस निरीक्षक सागर भारस्कर, पोलिस उपनिरीक्षक
कारेगावकर, बीट जमादार वानखडे, गोपनीय माहिती अधिकारी पंकज ठाकरे, बीट जमादार
सांगळे, महिला पोलिस प्रिया बारेकर, विस्तार अधिकारी सागर भंडारी, संरक्षण अधिकारी
श्याम गोमासे, ग्रामसेवक वानखडे, उपसरपंच जाधव, अंगणवाडी सेविका मुक्ता टारफे,
लता
गाढवे आदींच्या उपस्थितीत पार पडली.
बाल विवाहाची काही माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड
लाईन- 1098 वर
माहिती
द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment