दहा मृत्युसह 301 जण पॉझेटिव्ह ; 345 कोरोनामुक्त

 


       यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात दहा मृत्युसह 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 345 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 54 व 63 वर्षीय पुरुष तसेच 53, 72 व 76 वर्षीय महिला, दारव्हा येथील 71 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 78 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 68 वर्षीय पुरुष, नेर येथील 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 310 जणांमध्ये 189 पुरुष आणि 112 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 125 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद येथील 32, दिग्रस 26, उमरखेड 25, पांढरकवडा 20, बाभुळगाव 16, घाटंजी 11, वणी 11, नेर 10, आर्णि 8, दारव्हा 5, कळंब 5, महागाव 3, मारेगाव 1 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

            सोमवारी एकूण 2651 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2350 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3119 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1584 तर गृह विलगीकरणात 1535 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 30952 झाली आहे. 24 तासात 345 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27139 आहे. तर जिल्ह्यात एकूण 694 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून मृत्युदर 2.24 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 287991 नमुने पाठविले असून यापैकी 285702 प्राप्त तर 2289 अप्राप्त आहेत. तसेच 254750 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी