जिल्ह्यात 643 जण कोरोनामुक्त ; 627 नव्याने पॉझेटिव्ह

 Ø आठ जणांचा मृत्यु

       यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात 643 जणांनी कोरोनावर मात केली असून 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आठ जणांचा मृत्यु झाला. कोरोनातून बरे झालेल्या व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 643 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 43, 73, 84, 89 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 41 वर्षीय महिला आणि पुसद येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 627 जणांमध्ये 424 पुरुष आणि 203 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 198 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 66, वणी 52, पुसद 51, दिग्रस 48, पांढरकवडा 45, बाभुळगाव 31, घाटंजी 27, दारव्हा 19, आर्णि 18,  मारेगाव 17, झरी 17, नेर 16, महागाव 12, कळंब 5, राळेगाव 2 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

            शनिवारी एकूण 4079 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3145 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1840 तर गृह विलगीकरणात 1305 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 33330 झाली आहे. 24 तासात 643 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 29451 आहे. तर जिल्ह्यात एकूण 734 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.84 असून मृत्युदर 2.20 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 306922 नमुने पाठविले असून यापैकी 305550 प्राप्त तर 1372 अप्राप्त आहेत. तसेच 272220 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास परवानगी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव यांच्या 4 एप्रिलच्या ब्रेक द चेन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याकरीता 30 एप्रिल 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मार्गदर्शक सुचना लागू करण्यात आल्या आहेत. तसेच आठवड्याच्या शेवटी शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र राज्यात रक्तसाठ्याची कमतरता असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत राजकीय, सामाजिक, धार्मिक, अशासकीय संस्था, गृहनिर्माण संस्था यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करावयाचे असल्यास त्यांना शनिवार व रविवार या संचारबंदीच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी आदेशान्वये कळविले आहे.

 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी