जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

                      

v ‘पाझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : दोघांना डिस्चार्ज

यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. सोमवारी तीन जणांच्या मृत्युची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युचा आकडा सहा झाला आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी मृत्यु झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आहे. यात पुसद येथील 60 वर्षीय आणि दारव्हा येथील 45 वर्षीय पुरुष तर दारव्हा येथील 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यु झालेल्या तिघांनाही सारीची लक्षणेसुध्दा होती. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत 32 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 39 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.  

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी