नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी करण्याचे आवाहन

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते. परंतू जिल्ह्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन, जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2 लाख 82 हजार 386 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे 2 लाख 11 हजार 148 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 149 कोटी 5 लाख 20 हजार इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बॅक खात्‍याशी लिंक नसणे, आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी केली नसल्यामुळे अजूनही 64 हजार 138 बाधीत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरीत करता आलेला नाही. त्यामुळे तालुका कार्यालय, तलाठी यांच्याकडून व्हीके नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी करावे. त्यानंतर शासनस्तरावरून मदत थेट बॅक खात्यात जमा करण्‍यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी