हर घर तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज पोस्ट कार्यालयात उपलब्ध

यवतमाळ दि.३ ऑगस्ट जिमाका :- भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला आझादी का अमृत महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आजपासून टपाल कार्यालयामध्ये राष्ट्रध्वजाची विक्री सुरू करण्यात आली आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व लोकांना आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेत टपाल खातेही महत्वाची भुमिका बजावत आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी जवळच्या कोणत्याही पोस्टात जाऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ डाकघर अधिक्षक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल