जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचे तर्फे पदयात्रेचे आयोजन

यवतमाळ,दि.१७ ऑगस्ट:(जिमाका) - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांचे आदेशावरून जिल्हा विधी सेवा प्रधिकरण जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचे तर्फे दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ वाजता स्वातंत्राचा अमृत मोहत्सवानिमित्य घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचा संदेश देण्याकरीता पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर पदयात्रा रॅलीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले.सदर पदयात्रा रॅलीमधे यवतमाळ मुख्यालयातील न्यायिक अधिकारी,वकील मंडळी कर्मचारी व पॅरा विधी स्वंयसेवक,अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ७५ मिटर लांबीचा तिरंगा खांद्यावर घेत ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून आणि चौका चौकातून मार्गक्रमण करत जिल्हा न्यायालय ते पोस्ट ऑफीस चौक,एल.आय.सी चौक ते जिल्हा न्यायालयत येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.सदर पदयात्रेमध्ये घरोघरी तिरंगा लावण्याबाबत व स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी