जिल्ह्यात दाखल झालेल्या 21 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
यवतमाळ,
दि.20 : लॉकडाऊनमुळे
अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी
शासनाने त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडलेले
नागरिक, विद्यार्थी, मजूर आदी स्वगृही परत येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही बाहेरच्या
राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून नागरिक आले आहे. या नागरिकांची आरोग्य विषयक
तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात स्वगृही
परतलेल्या 20 हजार 800 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्याला सुरवात
होताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनीसुध्दा इतर
राज्यांचे सचिव, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाकडून सर्व
प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक आता स्वगृही येत आहे. जिल्ह्यात परत
येणा-याची तालुकास्तरीय समितीमार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस
गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यानुसार यवतमाळ जिल्ह्यात बाहेरच्या राज्यातून
3818 नागरिक तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून 16982 असे एकूण 20800 नागरिक
स्वगृही आले आहेत. संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून
त्यांची आरोग्य विषयक तपासणी होत आहे. यात ताप, सर्दी, खोकला व इतर बाबींची तपासणी
केली जाते.
Comments
Post a Comment