मजीप्राच्या अभय योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नळधारक ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन ;
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरीता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार (व्याज) माफी सवलतीच्या अभय योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नळधारक ग्राहकांनी या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मजीप्राच्या जलव्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व नळधारक ग्राहकांना दि.३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाणी देयकावरील १०० टक्के व्याज माफीच्या अभय योजनेस मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
प्राधिकरणाच्या सर्व ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेत सहभागी व्हावे. या योजनेचा कालावधी दि ३१ ऑक्टोबरला संपुष्टात येणार असल्यामुळे तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment