आठ नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर
यवतमाळ, दि. 25 : राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायतींची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, घाटंजी, आर्णी व दारव्हा या आठ नगर परिषदांचा प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
गुरुवारी, दि. 30 जून 2016 रोजी सदस्य पदांचा आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिद्ध करणे, शनिवारी, दि. जुलै रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण  प्रवर्गातील महिला नगर परिषद सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढणे, मंगळवार, दि. 5 जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या आरक्षणाची माहिती (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाशांच्या महिती आणि हरकती व सुचना मागविणेकरीता वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद, नगर पंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व सुचना मागविण्याचा कालावधी मंगळवार, दि. 5 जुलै ते गुरुवार, दि. 14 जुलैपर्यंत राहणार आहे. बुधवार, दि. 27 जुलै रोजी प्राप्त हरकती व सुचनावर सुनावणी देणे, मंगळवार, दि. 2 ऑगस्ट पर्यंत हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. बुधवार, दि. 10 ऑगस्ट पर्यंत अंतिम प्रभार रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 16 ऑगस्ट रोजी अधिनियमातील कलम 10 नुसार जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात आणि स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध  करतील.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. 1 मार्च ते 16 ऑगस्ट 2016 पर्यंत मतदारयाद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तयार होणारी मतदारयादी जिल्ह्यातील आठ नगर परिषदांच्या निवडणुकीकरीता उपयोगात आणली जाईल.
1 जानेवारी 2016 रोजी 18 वर्षे वय पुर्ण झाली आहे, अशा मतदारांनी त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ठ करण्याकरीता नमुना-6 मध्ये संबंधित तहसिल कार्यालय किंवा केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा. तसेच ज्या मतदारांची नावे दोन-तीन भागात समाविष्ठ असतील अशा मतदारांनी त्यांची नावे त्यांना पाहिजे असलेल्या भागात ठेवून इतर भागातून कमी करण्याबाबत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना कळवावे, तसेच ज्या नागरीकांना मतदारयादीच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असेल त्यांनी नमुना-8 भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी