शांतता समितीसाठी इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा व शांतता कायम राहण्यासाठी  शांतता समिती काम करीत असते. जिल्ह्यात असलेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीचे पुनर्गठन करावयाचे असल्याने इच्छुकांनी यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्हास्तरीय शांतता समितीत सर्व धर्मातील मान्यवर व्यक्ती, समाजातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संघटनेचे सदस्य, वकील, निवृत्त पोलीस अधिकारी, डॉक्टर, सामाजिक संस्थांचे सदस्य, व्यापारी, दुकानदार, उद्योजक, कामगार क्षेत्रातील व्यक्ती, शैक्षणीक क्षेत्रातील व्यक्ती आदींचा समावेश करण्यात येणार आहे. या विविध घटकातील ज्या व्यक्तींना जिल्हास्तरीय शांतता समितीवर काम  करण्याची इच्छा आहे. अशा व्यक्तींनी आपली सविस्तर माहिती, पत्ता, मोबाईल आदींचा समावेशासह पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक 30 जूनपर्यंत अर्ज करावयाचे आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. आलेल्या अर्जानुसार संबंधीत व्यक्तींच्या जिल्हा दंडाधिकारी  यांच्याकडून मुलाखतीत घेण्यात येणार असून त्यासाठी अर्ज कर्त्यांना बोलाविण्यात येणार आहे, असे जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य सचिव तथा मुख्यालय पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी