पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात
* जिल्हाधिकऱ्यांचे निर्देश
यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यातील शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध तक्रारी असतात. या तक्रारी करण्यासाठी ते पोलिस स्टेशनमध्ये जातात. तथापि अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, पर्यायाने असे नागरिक जिल्हा दंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्याकरीता येतात. त्यामुळे संबंधित पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
कोणत्याही पोलिस स्टेशनमधील पोलिस स्टेशन अधिकारी नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेत नसतील, तर अशा प्रकरणाबाबतची माहिती संबंधितांनी त्यांच्या तालुक्याशी निगडीत तालुका दंडाधिकारी यांच्याकडे सादर करावी. अशा प्रकरणांमध्ये तालुका दंडाधिकारी हे पोलिस स्टेशन अधिकारी यांच्याशी तक्रार दाखल करून घेण्याबाबत चर्चा करून प्रकरणांमध्ये कार्यवाही करतील. ज्या नागरिकांच्या तक्रारी पोलिस सटोशन अधिकारी दाखल करून घेत नाही, अशा नागरिकांनी तालुका दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळचे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी