मानवसेवा, बालकल्याण
व नैपुन्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 28 : राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार, राष्ट्रीय
बालकल्याण पुरस्कार व विशेष नैपुन्य पुरस्कारासाठी इच्छुकांकडून दिनांक 5 जुलैपर्यंत
तीन प्रतीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
राजीव गांधी मानवसेवा 2016, विशेष नैपुन्य पुरस्कार 2016
साठी तर राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार सन 2015 व 2016 साठी प्रस्ताव मागविण्यात येत
आहे. सदर पुरस्कारासाठी राष्ट्रीय निवड समितीमार्फत बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या तीन व्यक्तींची निवड केली जाणार आहे. पुरस्कारासाठी बालकांच्या क्षेत्रात
दहा वर्षांपेक्षा अधिक उल्लेखनिय कार्य केलेले असणे आवश्यक आहे. हे काम गुणवत्तापूर्ण
व महत्वाचे असावे. कोणत्याही संस्थेचे मानधन, वेतन घेणारे व्यक्ती निवडीसाठी पात्र
ठरणार नाहीत. बालविकास, बालसंरक्षण, बालकल्याण या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली
असणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती www.wcd.nic.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. इच्छुकांनी यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात दिनांक
5 जुलैपर्यंत तीन प्रतीत अर्ज सादर करावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment