‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी’
*स्पर्धेत शेतक-यांचा
उर्त्फुत सहभाग
यवतमाळ, दि. 12ः बळीराजा चेतना
अभियानातर्फे शेतक-यांसाठी आयोजित ‘बळीराजा प्रेरणा
प्रश्नोत्तरी स्पर्धेला शेतक-यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शेतक-यांचे मनोधैर्य
वाढविण्यासाठी उपाया सोबतच शेती जीवनाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आले आहे. या
स्पर्धेचे प्रथम दहा, व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे
बक्षीस ठेवण्यात आले आहे.
शेतक-यांचे मनोधैर्य
वाढवून त्यांच्या जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी जिल्हयात बळीराजा चेतना
अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्हावी यासाठी
हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धेची प्रश्नपत्रिका ही शेतक-यांना तहसील
कार्यालयामार्फत तलाठी यांच्याकडून शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या
स्पर्धेच्या माध्यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण
कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये
कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमीन,
पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्यासाठी
उपयोजना, पिक विमा, पाल्याचे
विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध शेती व शेतकरी कुटुंबाशी
निगडीत २० गुणांची ही प्रश्नपत्रिकेतून शेतक-यांचे मनोर्धेय वाढविण्यासाठी
उपयुक्त ठरू पाहत आहे.
या स्पर्धेचे मुल्यमापणासाठी उत्तरपत्रिका
तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी
केल्या जाणार आहे. यात सर्वाधिक गुण
असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या
स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे. जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती
यापैकी लकी ड्रॉ पदधतीने अंतिम ३ लोकांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.
०००००
Comments
Post a Comment