‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी
*स्पर्धेत शेतक-यांचा उर्त्‍फुत सहभाग
यवतमाळ, दि. 12ः   बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतक-यांसाठी आयोजित बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धेला शेतक-यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाया सोबतच शेती जीवनाशी निगडीत प्रश्‍न विचारण्‍यात आले आहे. या स्‍पर्धेचे प्रथम दहा, व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे.
            शेतक-यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍या जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्‍हयात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्‍हावी यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी यांच्‍याकडून शेतक-यांना उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्‍ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमीन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्‍यासाठी उपयोजना, पिक विमा, पाल्‍याचे विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध शेती व शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्‍नपत्रिकेतून शेतक-यांचे मनोर्धेय वाढविण्‍यासाठी उपयुक्‍त ठरू पाहत आहे.    
या स्‍पर्धेचे मुल्‍यमापणासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या जाणार आहे.  यात सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे.  जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पदधतीने अंतिम ३ लोकांची निवड लवकरच करण्‍यात येणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल