‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी
*स्पर्धेत शेतक-यांचा उर्त्‍फुत सहभाग
यवतमाळ, दि. 12ः   बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतक-यांसाठी आयोजित बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धेला शेतक-यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाया सोबतच शेती जीवनाशी निगडीत प्रश्‍न विचारण्‍यात आले आहे. या स्‍पर्धेचे प्रथम दहा, व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे.
            शेतक-यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍या जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्‍हयात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्‍हावी यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी यांच्‍याकडून शेतक-यांना उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्‍ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमीन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्‍यासाठी उपयोजना, पिक विमा, पाल्‍याचे विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध शेती व शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्‍नपत्रिकेतून शेतक-यांचे मनोर्धेय वाढविण्‍यासाठी उपयुक्‍त ठरू पाहत आहे.    
या स्‍पर्धेचे मुल्‍यमापणासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या जाणार आहे.  यात सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे.  जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पदधतीने अंतिम ३ लोकांची निवड लवकरच करण्‍यात येणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी