आयसोलेशन वॉर्डातून 31 जणांना सुट्टी


v 73 जणांचे निगेटिव्ह तर एक पॉझेटिव्ह रिपोर्ट प्राप्त
v पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9
       यवतमाळ, दि. 13 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 31 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.
            नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 13 एप्रिलच्या रात्रीपासून आतापर्यंत एकूण 74 रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. यापैकी 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आहे. सदर व्यक्ती हा यवतमाळ येथील पॉझेटिव्ह असलेल्या स्थानिक नागरिकाच्या थेट संपर्कात आला होता. तसेच गत एका आठवड्यापासून तो आयसोलेशन वॉर्डात भरती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 9 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 154 जण भरती आहेत. तसेच सोमवारी 15 नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.
            सद्यस्थितीत गृह विलगीकरणातील नागरिकांची संख्या 387 आहे. यात शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचासुध्दा समावेश आहे. 64 लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी 23 जण अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह येथे तर 41 जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात आहेत.
            पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. यासाठी 07232 - 240720, 07232 - 239515, टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोव्हिड - 19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांची पालन असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

मृत्यु झालेल्या ‘त्या’ व्यक्तिचा रिपोर्ट निगेटिव्ह : रविवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्या बापूराव भागुराव गोपने (वय 80) रा. गणेश नगर, वड़गाव, यवतमाळ यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला. 12 एप्रिल रोजी सकाळी ते दवाखान्यात भरती झाले होते. 12 दिवसांपासून त्यांना खोकला व दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. तसेच त्यांना सारीचे पण लक्षण होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांचे नमूने नागपुरला पठावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी