संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांवर दंड वसूल
v 517 प्रकरणामध्ये कारवाई
v मास्क न
वापरणाऱ्यांची प्रकरणे सर्वाधिक
यवतमाळ,
दि. 18 : संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन
न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन
करणा-यांकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 517 प्रकरणात ही कारवाई
केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांची प्रकरणे सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध
करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली
निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक
ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या
विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द
जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 517 प्रकरणात एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपये
दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल
जिल्ह्यातील 447 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 रुपये प्रमाणे एकूण 89 हजार 400
रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल यवतमाळ, पुसद, बाभुळगाव, राळेगाव व नेर
तालुक्यातील एकूण 12 प्रकरणात प्रती व्यक्ती 500 रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दंड
वसुल करण्यात आला. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल 39 प्रकरणात
प्रती व्यक्ती 2 हजार रुपये दंड प्रमाणे एकूण 78 हजार रुपये तर किराणा दुकानात
दरपत्रक न लावल्याबद्दल प्रती व्यक्ती 2 हजार रुपये प्रमाणे 19 प्रकरणात 38हजार
रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रशासनाने वेळोवेळी जारी
केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा
जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
000000000
Comments
Post a Comment