राष्ट्रीय पिक
विम्याचे 117 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
*रक्कम मिळाली
नसल्यास बँकेत चौकशी करावी
यवतमाळ, दि. 21 : राष्ट्रीय पिक विमा योजना यवतमाळ जिल्ह्यात
खरीप 2015च्या हंगामासाठी लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत खरीप 2015मध्ये भाग
घेतलेल्या एक लाख 89 हजार शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाईपोटी 117 कोटी 59 लाख
रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंमागातील पिक विम्यापोटी नुकसान भरपाई
म्हणून शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पिकविम्याबाबत
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि. 18 जुलै रोजी जिल्हास्तरीय समितीची
सभा झाली. यात अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पिकविम्याची रक्कम प्राप्त झाली असून ही
रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे सांगितले. ज्या
शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे, परंतु ही रक्कम प्रत्यक्ष खात्यात
जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment