विद्यार्थी अपघात
योजनेतून 35 लाखांची मदत
यवतमाळ, दि. 28 : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना
होणाऱ्या अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येते. जिल्ह्यातील
49 विद्यार्थ्यांना 35 लाख 25 हजार रूपयांची मदत देण्यास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप
सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला
प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर उपस्थित होत्या.
जिल्ह्यात 2014-15 आणि 2015-16 या दोन वर्षांमधीहल एकूण
57 विद्यार्थ्यांना मदत द्यावयाची होती. यापैकी 49 विद्यार्थ्यांना 35 लाख 25 हजार
रूपयांची मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना मदत
देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार
करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना केल्या.
या योजनेत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूसाठी 75 हजार रूपये,
अपघातामुळे दोन अवयव यामध्ये दोन डोळे किंवा एक अवयक आणि एक डोळा निकामी होऊन कायमचे
अपंगत्व आल्यास 50 हजार रूपये, अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी होऊन
अपंगत्व आल्यास 30 हजार रूपये मदत देण्यात येते.
00000
Comments
Post a Comment