जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित
रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार जमावबंदी आदेश लागू
करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत जमावास
बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे,
माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली
आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1)
व 37 (3)अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र
प्रताप सिंह यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे.
0000000
Comments
Post a Comment