समाजातील प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावे
*जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 : अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनी त्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषांगाने चर्चा करण्यासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र  प्रताप सिंह यांनी केले आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यायातील महसूल भवनात जिल्हा अल्पसंख्याक सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधीसमवेत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाकरिता काम करू इच्छिणाऱ्या सेवाभावी संस्था, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारे समाजसेवी नागरीक यांना बैठकीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी आपली नावे व मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षातील टोल फ्री 1800 230 6360 किंवा 1077 या क्रमांकावर नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल