आर्थिकदृष्ट्या सबळ झाल्यास शिधापत्रिका बदलून घ्यावी
*तहसिलदारांचे आवाहन
यवतमाळ, दि. 28 : अंत्योदय, बीपीएल प्राधान्य योजनेंतर्गत शिधापत्रिका काढून शासकीय योजनेचा आर्थिकदृष्ट्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र सध्यास्थितीत ही शिधापत्रिकाधारक आर्थिकदृष्ट्या सबळ झाले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन या शिधापत्रिका बदलून घ्याव्यात, असे आवाहन यवतमाळ येथील तहसिलदार यांनी केले आहे.
प्रशासनातर्फे येत्या काळात अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांची सखोल व सुक्ष्म चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे कार्य तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अपात्र शिधापत्रिकाधारक शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अंत्योदय, बीपीएल शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेत बदल करून शुभ्र शिधापत्रिका काढून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल