संत्रा, मोसंबी फळपिकासाठी हवामान आधारित विमा
*विम्यासाठी 12 जुलै अंतिम मुदत
*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 8 : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत  पुनर्रचित हवामानावर आधारीत पिक विमा योजना राज्यात 2016 मध्ये मृग बहारासाठी संत्रा आणि मोसंबी फळपिकांकरीता राबविण्यात येणार आहे. ही योजना शेतकरी हिताची असून जिल्ह्यासाठी अंतिम मुदत 12 जुलै राहणार आहे.
शासनाने संत्रा आणि मोसंबी पिकासाठी यावर्षीपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा हप्ता हा विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी रक्कम कमी असेल. यवतमाळ जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अधिसूचित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्ती आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मृग बहारासाठी विमा हप्ता बँकेत भरण्याची अंतिम मुदत 12 जुलै असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी