प्रधानमंत्री पिक विमा योजनेस 2 ऑगस्टपर्यंत
मुदतवाढ
यवतमाळ
दि. 30 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2016 ही अंतिम
मुदत देण्यात आली होती, परंतु हा कालावधी कमी पडल्याने शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात
घेता दि. 2 ऑगस्ट 2016 पर्यत योजनेत सहभागी होण्यास मुदतवाढ दिली आहे.
प्रधानमंत्री
पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 करिता अधिसुचित क्षेत्रातील पिकांकरिता प्रधानमंत्री
पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी
पिक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 होती. ही योजना नवीन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या
अडचणी आणि मागणी लक्षात घेता केंद्र शासनाने अंतिम मुदत वाढवुन 2 ऑगस्ट केली आहे. शेतकऱ्यांनी
अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 2 ऑगस्टपर्यत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment