कृषी साहित्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 25 : जिल्हा परिषदेच्या कृषी
विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत नवबौध्द आणि अनुसूचित जाती तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत
आदिवासी लाभार्थ्यांना अनुदानावर कृषी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी
दिनांक 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत नवबौध्द आणि अनुसूचित जातीच्या तसेच
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहिर, ईलेक्ट्रिक
मोटरपंप संच आणि पाईप, बैलजोडी, बैलगाडी आदी कृषी साहित्य पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी
गटविकास अधिकारी आणि कृषि अधिकारी यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांसह
शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करायचा
आहे. योजनेबाबतच्या अटी शर्ती आणि इतर माहिती पंचायत समितीत कृषी अधिकारी यांच्याकडे
उपलब्ध आहे. शंभर टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विकास
अधिकारी जे. आर. राठोड यांनी केले.
00000
Comments
Post a Comment