मतदारयाद्या शुद्धीकरण मोहिम
यवतमाळ, दि.24 :भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदारयाद्या शुध्दीकरण करण्याची मोहिम राबविण्यात
येत आहे. या मोहिमेंतर्गत दि.31 ऑगस्टपर्यंत मतदानकेंद्राच्या ठिकाणी नमुना 6, 7,
8 व 8 अ स्विकारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत मतदारयादीमध्ये
नाव नोंदणीसाठी आजपर्यंत 25 हजार 951 अर्ज प्राप्त झाले आहेत.राज्य निवडणूक आयोगामार्फत
नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका घेतल्या
जाणार आहेत.या निवडणुकीकरीता दि. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची
नावे मतदारयादीमध्ये घेतल्या जाणार आहे.ज्या मतदाराचे नाव दि.31 ऑगस्टपर्यंत मतदारयादीमध्ये
नोंदविण्यात येणार नाही, त्यांना नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत होणाऱ्या
नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही. त्यामुळे ज्या मतदारांची
1 जानेवारी 2016 रोजी 18 वर्षे वय पुर्ण झालेली आहेत, अशा मतदारांनी किंवा ज्यांचे
मतदारयादीमध्ये नाव समाविष्ठ नाही अशा मतदारांनी त्यांची नावे दि. 31 ऑगस्टपर्यंत नोंदवावीत,
असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment