सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी
यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात दहीहांडी, पोळा,
तान्हा पोळा, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात कायदा व
सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार प्रतिबंध आदेश लागू
करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 25 ऑगस्ट
ते 8 सप्टेंबरपर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे,
माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली
आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलिस कायदा
1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात
येईल, असे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment